4 Apr 2015

रात्रीतली तुझी आठवण...!!!!


रात्रीचा चंद्र आणि चांदण्यांची रात्र,
आणि या रात्रीच्या सोबतीला तुझ्या आठवणींचे सत्र,
मग कधी या कुशीवर तर कधी त्या कुशीवर झुलत राहयचे,
आणि डोळे घट्ट मिटून फक्त तुला आठवत राहयचे,
झोप येत नाही म्हणून खिडकीत उभे राहयचे,
आणि आकाशातल्या चमचमणाऱ्या प्रत्येक ताऱ्यात पुन्हा तुलाच शोधू पहायचे,
या प्रत्येक ताऱ्यात तुझे बहुरूप अनुभवायचे,
आणि हा तारा माझा तो तारा माझा करत प्रत्येक ताऱ्याला आपले करायचे,
मग हळूच नजर त्या चंद्राकडे फिरवायची,
आणि अबोल अश्या त्या चंद्राकडे फक्त तुलाच मागायचे,
दिवस तर कशाही सरतो,
पण माझी प्रत्येक रात्र मी अशीच काहीशी जगतो,
कधी या चंद्र ताऱ्यांकडे रोज तुला मागायचे,
तर कधी तुझ्या आठवणीत स्वतःशीच काही तरी पुटपुटआयचे,
आता फक्त दोनच इच्छा मनात आहेत,
एकतर पुन्हा तुझा होऊन तुझ्यासाठी जगायचे,
नाहीतर कधी ही न संपणाऱ्या या रात्रीत रोज स्वतःला मरताना पहयाचे..!!!!

माणूस आणि वागणूक…

नुकताच  ऑफिस मध्ये घडलेला एक किस्सा, ऑफिसमध्ये  तसे कोणाशी जास्त बोलण नाही काही मोजक्याच लोकांशी ते ही कामाशी  निगडीत… त्यातूनही थोडा वेळ मिळाल्यास हलके आणि मिश्किल असे विनोद… पण त्या विनोदांचा एखाद्यावर इतका परिणाम होतो कि विनोद करणाऱ्याच्या वागणुकीकवर  सरळ सरळ संशय घेतला जातो… अश्या विवेकशून्य बुद्धीमत्तेवर हसावे कि रडावे याचाच गंभीर असा प्रश्न मला पडला आणि खरच आपलं  काही चुकते का या गोष्टीचा विचार मनात घोळू लागला. 

अजूनही उत्तर काही सापडले नाही कदाचित सापडणार ही नाही कारण स्वतःच्या चुका माणसाला सहजरीत्या समजणं तसा कठीणच. असो पण अश्या विवेकशून्य लोकांशी मराठी भाषेत म्हणाव तर डील कसा कराव हा कदाचित जास्तच स्पर्धात्मक असा भाग मला वाटतो. ज्या व्यक्तीला तुम्ही नावाशिवाय जराही ओळखत नाही त्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उचलण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला हाच प्रश्न मला इथे आवर्जून विचारावासा वाटतो.

माझ्यामते अश्या लोकांनी जरा त्यांचा समाजातला वावर वाढवावा, मग त्यांना वागणूक या शब्दाचा खरा अर्थ सापडेल. हाय स्टेटस मध्ये जगणाऱ्या या लोकांना समाज या शब्दाचा अर्थ ही तितक्याच आशयाने समजावणे किवा त्यांनी तो स्वतःहून समजून घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. खरंतर कोणी कसे वागावे हे सांगण्या इतका मी काही मोठा संत किवा अगदी सावरकरांसारखा क्रांतीकारी नाही. पण समाजात कसे वागवे याचे ज्ञान मला नकीच अवगत आहे.

मला नेहमीच असं वाटत जरा माणसांनी स्वतःच्या न वापरलेल्या बुद्धीचा थोडा वापर करावा आणि विनोद, वागणूक, बोलणं, ज्ञान, आपुलकी, भावना यातला फरक समजून आणि अनुकरून मग यथ्हेछ अशी टिपणी करावी, पण  त्याचसोबत ती उलघडून सांगण्याची बोद्धीक ताकद ही त्यांच्यात असावी. एखाद्याच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे त्याच्या अब्रूचे लख्तरे तोडल्यासारखेच आहे असे मला वाटते. असो प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असते कोणी कसे वागावे बोलावे हा ज्याच्या त्याचा प्रश्न पण आपण या समाजाचे काही देणे आहोत हे विसरता कामा नये जसे आपण इतरांवर टिपणी करतो तसे आपल्यावरही टिपणी करणारे असंख्य लोक या भूतलावर जन्माला आले आहेत हे विसरता कामा नये.

तुमचा अमुल्य वेळ वाया गेल्याबद्दल क्षमस्व:…!!!

सुशांत बनकर.