लोकपाल बिल पास करू आणि एक योग्य असे लोकपाल बिल लोकांपुढे मांडू असे म्हणणारे कॉंग्रेस सरकार अचानक बदलले आहे. दिलेला शब्द न पाळता या वरती आणखी चर्चा करून प्रत्येक विभागाला वेगळे असे नियम लागू करू असे म्हणत अण्णा हजारेनी मांडलेल्या लोकपाल बिलाला कमकुवत करण्याचे काम हे कॉग्रेस सरकार करत आहे. आणि यासाठीच अण्णा हजारेनी ११ डिसेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण जंतरमंतर मैदानामध्ये करण्याचे ठरवले आहे. आणि २२ डिसेंबर पर्यंत यावर काहीही तोडगा न निघाल्यास २७ डिसेंबर पासून रामलीला मैदानावर आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. हीच खरी वेळ आहे कॉंग्रेस सरकला लोकशाहीची ताकद काय असते ते दाखवून द्यायची. पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयाला रस्त्यावर उतरून या सरकारला त्यांची जागा दाखवायची आहे. अर्थातच अण्णांच्या अहिंसेच्या मार्गानेच... तेव्हा मित्रानो तयार राहा स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी... मी तयार आहे तुम्ही तयार आहात का ??
सुशांत बनकर
सुशांत बनकर
No comments:
Post a Comment